कोल्हापूरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर करवीर तालुक्यात बीड हे गाव आहे. तुळशी आणि भोगावती या दोन नद्यांच्या संगमावर हे गाव वसलं आहे. सध्या हे गावं इतर गावाप्रमाणे वाटत असलं तरीही या गावाने आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. कारण या गावात परमेश्वर सोन्याचा पाऊस पाडतो, असं या गावातील लोक सांगतात.